Friday 22 September 2017

यशाचं कारण ठरेल नात्याचं सर्व्हीसिंग.....

यशाचं कारण ठरेल नात्याचं सर्व्हीसिंग.....
   गाडी एकदा घेतली की ती आपली आणि आपलीच राहणार चांगलीच राहणार हि अपेक्षा व्यर्थ आहे. त्यासाठी गरज असते ठराविक काळानंतर त्याच्या सर्व्हीसिंगची.  नात्यांचं असंच असतं त्याला सतत ताजेपणा लागतो तुम्ही एकमेकांसोबत किती वर्ष राहिलात यापेक्षा महत्वाचे ते तुम्ही एकमेकांसाठी काय आहात आणि किती आहात. 
   खरंतर नाती Live-in असतात. महत्वाचं असतं तुमच्यातील नातं एकमेकांसाठी किती आहे. की ती फक्त अपरिहार्य केलेली सोबत आहे! नात्यातला गोडवा तोपर्येंत असतो जोपर्येंत तुम्हाला एकमेकांची ओठ आहे एकमेकांविषयी विश्वास आहे नात्याला सतत ताजेपणा लागतो नावीन्य लागत. तुम्ही केवळ बरोबर राहता म्हणजे तुमच्यात प्रेम असेलच असं नाही ते प्रेम वाढत राहण्यासाठी सतत काहीतरी करावं लागत म्हणू तुम्ही एकमेकांसाठी काय आहात किती आहात आणि कोण आहात ते महत्वाचं .......

    अनिल अवचट यांचे "स्वतःविषयी" हे आत्मचरित्य बायको सुनंदाला अर्पण करतांना ते लिहितात " हे पुस्तक अर्पण करण्यासाठी तुला माझ्यातून काहीकाळ बाहेर काढावं लागलंय त्यासाठी थोडी रुखरुख होतेय " या ओळीतून त्यांचं एकमेकांसाठी असणं म्हणजे काय ते कळत.

    माझ्या एक मैत्रिणीचं मला नेहमी औत्सुक्य वाटत काय असेल तीच आणि तिच्या आहोनं मधील नातं पूर्वी लग्न झालेलं असतांना आणि आपल्याकडे कायम दुसरेपणा येणार हे माहित असूनही एकत्र येण्याचा त्यांचा निर्णय नक्कीच सोपा नसावा, पण त्याहीपेक्षा सोपं नव्हतं १५ - २० वर्ष हे नातं टिकवणं ती आजही नवऱ्याचं नाव घेतांना जे लाजते ना ते आत्ता लग्न झालेली मुलगीदेखील लाजणार नाही.

   मला वाटत तुम्ही एकमेकांबरोबर किती काळ राहता यापेक्षा महत्वाचं आहे तुमच्यातला वेळ तुमच्यातील प्रेम वाढवतोय की नाही ते ! अन्यथा परदेशी किंवा परगावी नोकरीला असतांना काही आठवडे, काही महिने,एकमेकांचं तोंडही न पाहणारी जोडपी सुखानं नांदलीच नसती.

   मान्य आहे की आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला इतरही अनेक व्यवधानं आहेत स्वतःच अस्थित्व टिकवायचं आहे स्वतःला सिध्द करायचं आहे पण तुमच्यातल्या नात्याचा बळी देऊन जर हे सिध्द करायचं असेल तर त्याचा आनंद ना धड तुम्ही घेऊ शकाल ना इतर.....

   कुणी कुठल्याही नामवंत व्यक्तीला त्यांच्या यशाचं कारण विचारा, मेहनत तर आहेच पण त्याहीपलीकडचं मानसिक समाधान महत्वाचं आणि ते घरातून मिळत असंच उत्तर तुम्हाला मिळेल नवरा बायको म्हणून तुमच्यातलं नातं जर परिपक्व नसेल तर ?

   तुम्ही कायद्याने एकत्र आहेत की नाही या पेक्ष्या महत्वाचं आहे ते तुम्ही मनाने एकमेकांचे आहेत कि नाही आणि म्हणून मघाशी म्हटल्याप्रमाणे गरज आहे ती नात्याला वेळ देण्याची नात्याच्या सर्व्हीसिंगची नात्याला भरभरून वेळ द्या त्याला फुलू द्या तुम्ही खूप खूप आनंदी राहाल आणि तुमचा आनंदच तुमच्या यशाचं कारण ठरेल.

Hum Hain Iss Pal Yahan, Jaane Ho Kal Kahan
Hum Miley Na Miley, Hum Rahey Na Rahey
Rahegi Sadaa Yahan, Pyar Ki Ye Dastan
Sunenge Sadaa Jise,Yeh Zameen Asmaan 


अनामिक (PMJ)

No comments:

Post a Comment