Wednesday 31 August 2016

वाटे आयुष्यभर लहानच राहवे 
सगळं जग विसरून आईच्या कुशीत झोपावे
काळजी, चिंता, हे शब्दचं माहित नसावे
वाटे आयुष्यभर लहानच राहवे ....

संकट येताच बाबांजवळ जाणे
बाबांच्या आवाजाला थोडं दचकून अभ्यासाला बसावे
वाटे आयुष्यभर लहानच राहवे ....

आपली आवडती वस्तू न मागताच मिळवणे
वेळेचं काळाचं कसलंच बंधन नसणे
वाटे आयुष्यभर लहानच राहवे ....

वाटेल तेव्हा वाटेल तसं स्वच्छंदी जीवन जगणे
फुलपाखरांप्रमाणे सर्व दूर फिरावे
वाटे आयुष्यभर लहानच राहवे ....

कवच्या बाहेरील जग अजब आहे फार
ऐरावत रत्न थोर त्याला अंकुशाचा मार
म्हणून वाटे आयुष्यभर लहानच राहवे ....

सगळं जग विसरून आईच्या कुशीत झोपावे
वाटे आयुष्यभर लहानच राहवे ....

Monday 15 August 2016

सहज आठवली कविता आजच्या दिवशी …..
काय आणि का घेते मी प्रतिज्ञा……?
काय आणि का घेते मी प्रतिज्ञा, फ़क्त शब्दांचे बुडबुडे
जाते का कधी लक्ष, आपले तिच्या अर्थाकडे ?
म्हणता भारत देश आमचा, आम्ही भाऊ भाऊ सारे
का मग दंगली करता, तुमच्या मातृप्रेमाचे पुकारे ?
अभिमानाने सांगता, की भारतावर आमुचे प्रेम अती
मग भ्रष्टाचार करुन, का करता देशाची अधोगती ?
म्हणता आम्ही असू प्रामाणिक सदैव भारतमातेशी
करूयाका विचार, आहोत का प्रामाणिक किमान स्वतःशी ?
म्हणतांना जीवापाड जपू आमची भारतीय संस्कृती
मग का हो दडून बसते मनावर परकीय संस्कृती ?
ही प्रतिज्ञा का मग समाजात पोरासोरांची
आमची म्हणून घेण्याइतकीच किंमत नव्हे तिची …
घ्यायचीच असेल प्रतिज्ञा तर मनापासून घ्या
अन ती पाळण्यासाठी जरा तिच्या अर्थाकडे लक्ष द्या
अन ती पाळण्यासाठी जरा तिच्या अर्थाकडे लक्ष द्या……
अनामिका  …

भारत माता कि जय !